4/30/10

नादान हैं जो...

परवा कामावरून परत घरी येतांना रेडियो सुरू केला, तर अचानक तलतचा आवाज- मला एकदम माहेरचं माणूस भेटावं तसं झालं. लहान असतांना आमच्या घरी पं. जीतेंद्र अभिषेकी, पं वसंतराव देशपांडे, हे देव होते. फक्त शांतपणे देवघरात बसून नैवेद्य खाणारे देव नव्हे, तर सुरांची शिडी करून, त्यांच्या बरोबर आपल्यालाही स्वर्गात बरोबर घेऊन जाणारे देव...
तलत आणि लता मात्र घरचेच होते. दुपारी चहा पितांना किंवा रात्री आईस्क्रीम खातांना गप्पा रंगवणारे family friends! आमच्या बाबांची सवय होती, एक गाणं आवडलं, की ते टेप घासेतोवर वाजवायचं, आणि वाजवतांना स्वत:ही आळवायचं... तेव्हा पाठ झालेला तलत......तो काल परत......अचानक!

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हे
हम दर्द के सुर मे गाते हैं...........हम दर्द के सुर मे गाते हैं ।

माझा अतर्क्यावर विश्वास आहे. हे गाणं होतं, की माझी मनस्थिती समजून घेणारी अज्ञात शक्ती? कॉलेजात असतांना Percy Bysshe Shelley ची "To a Skylark" शिकतांना, त्यावर आधारित हे गाणं ऐकून एकदम ती कविता पण उमजल्यासारखी झाली होती.

Skylarkच्या स्वर्गीय आवाजाची अमूर्तता शेली ला दु:खांच्या पलिकडच्या जगातून आल्याचा भास होत होता. "तू कवी आहेस, आपल्याच भावविश्वाच्या किरणांत लपलेला, जगाला आशा-निराशेच्या द्वंद्वाची जाणीव करून देणारा?" "की तू बागेतला काजवा आहेस, फुलापानांआड दडून स्वैर गुणगुणणारा?"


लाख उपमा देऊनही न सुटलेलं कोडं असं, की तुझ्या गाण्यामागची स्फूर्ती कुठली आहे? दु:खाचा लवलेशही नसलेला शुद्ध परिपूर्ण स्वर- पृथ्वीवरच्या अर्ध्या-अधूऱ्या जगण्यातून तो स्वर आम्ही आणावा कुठून?

We look before and after,
And pine for what is not:
Our sincerest laughter with some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.

काँटों मे खिले हैं फूल हमारे
रंगभरे अरमानोंके......रंगभरे अरमानोंके ।
नादान हैं जो, इन कांटोसे
दामन को बचाए जातें हैं ॥

दु:खातून मुक्ती नव्हे, तर दु:खापासून पळवाट काढणाऱ्या skylark च्या स्वर्गीय, अमर्त्य गाण्यापेक्षा, दु:ख पचवून पुढे जाणा़या माणसाचा चा शेलीने पुरस्कार केला. दु:ख सोसल्याशिवाय सुखाची व्याख्या करता येत नसते, हे शेलीच्या कवितेचं सार आहे.

पण शैलेंद्र सिंग ह्यांचे बोल तिथेच न थांबता, उत्तुंग आशावादाकडे आपल्याला घेऊन जातात.
जब गम का अंधेरा घिर आए,
समझो के सवेरा दूर नही..........दूर नही ।
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं.......... तारे भी यही दोहराते हैं॥

दुसऱ्यांच्या दु:खात समरस होऊ शकण्यात माणसाच्या अश्रूंची खरी पवित्रता दिसते.

पहलू में पराये दर्द बसाके,
हँसना हँसाना सीख ज़रा..... तू हॅंसना हॅंसाना सीख ज़रा
तूफान से कहदो घिर आए,
हम प्यार के दीप जलाते हैं....... हम प्यार के दीप जलाते हैं ॥

जब हदसे गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं........ आँसू भी छलकते आते हैं॥

7 comments:

HAREKRISHNAJI said...

वा, काय सुरेख लिहिले आहेत. मी तलतचा निस्सीम भक्त आहे

विशाखा said...

Thank you! शैलेंद्र यांनी खरच शेली च्या कवितेवरून कल्पना घेतली होती की नाही हे मला माहिती नाही, पण साम्य अगदी ठळक आहे.

Unknown said...

Tu kharach khoop bhedi lihites!! Tuze article sakal madhe vaachele aani tuza blog pahila... weekend la wachin.

विशाखा said...

Thank you Hemant!

Vijay Lad said...

Chan lihites ga....keep writing...kahi madat lagali tar sang...mala olakhates ka....?

विशाखा said...

Vijay, comment sathi thank you! Sorry mala watta apla parichya nahi, pan tumchya shi olakh karun ghayla nakkich awadel.

ravi said...

Apratim