Showing posts with label गाणे. Show all posts
Showing posts with label गाणे. Show all posts

10/26/16

'Tis the season of Diwali

इथे क्रिसमसच्या सुमारास सगळ्या रेडिओ स्टेशन्सवर नाताळची गाणी लागतात. ती मला तर आवडतातच, पण लहान मुलांना अगदी वेडंच करतात. आमचं पिल्लू गेल्यावर्षी "Santaclaus is coming to town" म्हणून म्हणून आमचे कान पिकवत होतं, आणि त्याच्या पलिकडल्या वर्षी त्याला "Rudolf the red-nosed reindeer" मधला रुडॉल्फच हवा होता! रेनडियरची बाहुली शोधायला मी किती वेबसाईट पालथ्या घातल्या होत्या त्याची गणना च नाही!

पण आपल्या दिवाळीची अशी कुठली गाणी नाहीयेत, त्यामुळे मला छोट्याला काहीच शिकवता आले नाही. चित्रपटगीतं एकतर चांगली नाहीत, किंवा छोट्यांना गाता येतील अशी नाहीत. मग काय करायचे? त्याच सुमारास मी इथल्या मराठी शाळेत शिकवत असे. तिथे मुलांना "Sunday, Monday, Tuesday, Wednesday..."च्याच चालीत
"रविवार सोमवार मंगळवार बुधवार..." हे गाणे आम्ही शिकवायचो. मग त्यावरून मला सहज सुचले:

'Tis the season of Diwali, 
Fala lala la la lalala
Eat some yummy ladoo chakali, 
fala lala la la lalala
Let's make colorful Rangoli
Fala la lala la, lalala
Celebrating with family
Fala lala la la lalala
Paper-lanterns in the alley (आकाशकंदील हो!)
Fireworks will make us jolly
Fala lala la la lalala

'Tis the season of Diwali
Fala lala la la lalala
Ravan was a big bad bully
Lord Ram beat him for us, thankfully. 
Let's welcome him home, merrily
Light up lamps to show it truly!
Fala lala la la lalala

मराठी सणांचं गाणं इंग्रजीत, तर ख्रिसमसचं गाणं मराठीत म्हणायचं, म्हणजे ख्रिसमसप्रमाणेच दिवाळी, आणि मराठी, हीपण मुलांना जवळची वाटू लागतील, अशी आशा!
आणि हो, सर्वांना मनापासून

!!शुभ दीपावली!!


10/17/16

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है

दिल है, महफ़िलमें भी तनहा हो सकता है 
जो पाया था, वो ही अक्सर खो सकता है 

जाँ से जाते जाते हमने ये समझा 
बारिश में पत्थर को देखो, रो सकता है 

जज़्बातों के ढ़लते मौसम जाते रहें 
यादें तो फिर हर कोई पिरो सकता है 

अपनी ख़ताएँ गिनने वाले कम न हुए 
हम जो कर गुजरे वो किससे हो सकता है!

दर्द को सुननेवाले अबके कहाँ मिले 
ख़ुशियों का बाज़ार लगा है, वो सस्ता है 

तुमसे उम्मीदें तो थीं पर फिर सोचा 
उम्मीदों से हारे कच्चा वो रिश्ता है 

शहर था खाली, दोस्त नही थे, पर खुश थे 
राह उजड़ने की देखे, दिल वो कब बसता है 

हमसे पूछो मत हाल-ए-दिल अपनी कहो
प्यारा लगता है वो बच्चा जो हँसता है 

काश के हम भी होते सूखे पात की तरह 
कागज़ के पन्नो में सिमटा सो सकता है

3/16/15

भैरवी

आद्य स्वर म्हणुनी तुला, झाले तुझी संवादिनी
षडज- पंचम भारल्या तारांत मी "गंधारूनी"।


वेदनेच्या उमटता लहरी कधी तानेतल्या
तेजात क्षणभर नाचले उन्मुक्त नभी सौदामिनी।

आज नाकारू कसे ते दुःख तू मजला दिले
काव्य त्यतील घेतले स्वप्नांतही मी मागुनी।


भाव एकाकार होते, अंतरातिल गूज ही
हृदयी तुझ्या जे उमटले, अश्रूत ते ह्या लोचनी।


भेटते द्वैतास बेदरकार आता रोजही
गायली संपूर्ण मी ही भैरवी द्वैतातुनी.

मनावेगळी लाट

कुठेतरी एकदा वाचलं होतं, की कविता म्हणजे फक्त शब्द. त्यातून अर्थ, आशय, प्रतीक आणि प्रतिमा उपसून काढण्याचा आपण वृथा प्रयत्न करत राहतो. पण कविता म्हणजे फक्त शब्द. शब्दांच्या प्रेमात पडायला लावते, ती कविता. शब्दांची कधी न पाहिलेली, न चिंतलेली रूपं दाखवते, ती कविता. ती कविता मला ओढून नेते एका नवख्या प्रदेशात...

तुला पहिले मी...
कवीचं प्राक्तन- बघणे. काही बघतात, काही जगतात, पण कवी ते दोन्ही ही करतो. त्याला करावंच लागतं- लेखनातून. लिहण्यासाठी जगणं, आणि जगण्यासाठी लिहणं, स्वत:च्याच अनुभवांकडे तटस्थपणे बघणं.

“तुला पाहिले मी, नदीच्या किनारी
तुझे केस पाठीवरी मोकळे
इथे दाट छायांतुनी रंग गळतात
ह्या वृक्षमाळेतले सावळे"
ती, मूर्त आणि अमूर्त स्वरूपांच्या सीमारेषेवर उभी. तिच्या मोकळ्या केसांची मोहिनी,की दाट छायांतून गळणाऱ्या रंगांची? की ते दोन्ही रंग एकमेकांत मिसळेत नकळत?

तुझी पावले गे धुक्याच्या महालात
ना वाजली ना कधी नादली
निळागर्द भासे नभाचा किनारा
न माझी मला अन् तुला सावली
इतक्या अलगदपणे, पावलांचा आवाज न करता ती आली,कवीची प्रेरणा झाली. पण त्या उदास अनामिकेला खरी स्त्री म्हणावे, की नित्य अनुभवलेली सुंदर संध्या?
नभाचा किनारा! दोन अनोळखी शब्द. (किनारा सागराचा असतो, नभाचा नव्हे!) पण मूर्त आणि अमूर्ताशी खेळता खेळता ते दोन अनोळखी शब्द एकमेकांसमोर आले, तर अर्थाचा निळागर्द रंग डोळ्यांसमोर मांडून गेले.

मनावेगळी लाट व्यापे मनाला
जसा डोंगरी चंद्र हा मावळे
पुढे का उभी तू तुझे दु:ख झरते
जसे संचिताचे ऋतू कोवळे
“मनावेगळी लाट"... कवीच्या मनाचं सतत दुभंग होणं. मनावेगळ्या लाटेने व्यापून जाणं. ते टाळता न येऊन खूप व्याकुळतेने विचारणं, “पुढे का उभी तू? तुझे दु:ख झरते!” पुढे उभ्या "तिच्या" दु:खाशी एकरूप होतांनाही, कुठेही सावली नाही,ना त्याला, ना तिला, ह्याची वेदना समजून घेणं.

अशी ओल जाता तुझ्या स्पंदनातून
आकांत माझ्या उरी केवढा
तमातूनही मंद ताऱ्याप्रमाणे
दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा
तिचं झरणारं दु:ख आपलंसं करतांना, कवीच्या उरात एक आकांत. आणि तरीही, त्या एकरूपतेच्या क्षणातच कवीच्या अस्तित्वाचं सार्थक असतं. त्या एकरूपतेला कोणी प्रियकर-प्रेमिकेचा एकपणा म्हणतं, कोणी सं-वेदना, कोणी कवीमनाचं स्पंदन. त्या क्षणातच दु:खाला लखलखीत ताऱ्यात परिवर्तीत करण्याची क्षमता असते.
“दिसे की तुझ्या बिल्वरांचा चुरा...” दिसणे, बघणे.
जगण्यातून, असण्यातून काहीशा नाईलाजाने, काहीशा अपरिहार्यतेने, कवी बाहेर पडतो. मी ही बाहेर पडते.

मागे वळून बघतांना शोधत राहते,
ही प्रेमिकांची भेट होती?
की एका संध्याकाळच्या आर्ततेचं वर्णन,
की कविता जन्म घेते,त्या एका क्षणाचं?

3/31/13

गाणाऱ्या कविता

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, ह्या झोपडीत माझ्या॥
भूमीवरी निजावे, तारयांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे ह्या झोपडीत माझ्या॥

ही संत तुकडोजी महाराजांची ओवी. ओवी म्हणावी की कविता? पण आमच्या शाळेच्या पाठ्यपुस्तकात होती, म्हणून कविता म्हणते. त्याच वर्षीच्या हिंदीच्या पुस्तकात हे-

हर ग्राम हर नगर के हर राह हर डगर पर
कूचे गली मुहल्ले, बाजार हाट घर घर
हर ओर ही हजारों दीपक जले हुए हैं
जैसे कि रौशनी के अनगिन सुमन खिले हैं
जैसे कि हस उठी है, तारों की आज रानी
या चांद ने हजारों बनने की आज ठानी!

आज इतक्या वर्षांनतरही मला ह्या कविता आठवतायत, त्या खरं म्हणजे ह्या गाण्यामुळे, "ऐ दिल मुझे बता दे, तू किसपे आ गया है? वो कौन है जो आकर ख्वाबों पे छा गया है!"
परवा फिरायला जातांना सहज मी गुणगुणायला लागले, तर गाणं मला आठवेच ना. आठवली ती कविता! मौखिक ग्रंथपरंपरा आणि पाठांतरातला दुवा तेव्हा जाणवला. पाठांतर करायला आवडायचं, आणि त्यातून कविता व्हायच्या ही पटापट पाठ, म्हणून मजा यायची. कवितांना चाली लावून त्या वर्गात म्हणून दाखवायची हौसही खूप :) आता ऐ दिल मुझे बता दे वर सगळ्याच कविता कशा बसायच्या? मग दुसरं गाणं-

आओ बच्चो तुम्हे दिखाऍं झांकी हिन्दुस्तान की
इस मिट्टी से तिलक करो ये धरती है बलिदान की॥

थोडं ठाकून ठोकून त्यावर कुसुमाग्रजांना बसवलं की झालं-

आवडतो मज अफाट सागर अथांग पाणी निळे
निळ्या जांभळ्या जळात केशर सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेत शिंपित वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनाऱ्याकडे.
मऊमऊ रेतीत कधी मी खेळ खेळतो किती
दंगल दर्यावर करणा़ऱ्या वाऱ्याच्या संगती
उंच पांढरी दिसती केव्हा क्षितिजावर गलबते
देश दूरचे बघावयाला जावेसे वाटते...

आणि हिन्दीत तर त्या चालीवर वाट्टेल ते म्हणता येऊ शकतं असा भाबडा विश्वासच बसला होता-

लहरोंसे डरकर नौका पार नही होती
कोशिश करने वालोंकी हार नही होती
नन्ही चिंटी जब दाना लेकर चलती है
चढती दिवारोंपर सौ बार फिसलती है
मनका विश्वास रगों में साहस भरता है
गिरकर चढना चढकर गिरना न अखरता है
मेहनत उसकी खाली हर बार नही होती
कोशिश करने वालों की हार नही होती!

परवा फिरायला जातांना सतरा काळज्या आणि पंधरा गोष्टी डोक्यात भुंगा घालत होत्या, तेव्हा ह्या कविता मला वाचवायला आल्या!

आजीने सकाळी पूजा करतांना म्हटलेलं अथर्वशीर्ष असावं तशा ह्या कविता आहेत.
शेजारी भजन-टाळ-गजराचा नाद खोल अंतर्मनात साठवलेला असावा, तशा ह्या कविता आहेत.
रोज दुपारी चणेफुटाणेवाला आपले खास हेल काढून आरोळी ठोकत यायचा, तशा ह्या कविता आहेत.

त्या गुणगुणतांना मला पुन्हा माझ्या स्वत्त्वाची ओळख पटलीशी वाटली. त्यांचा नाद आश्वासक वाटला. गोळाबेरीज करून शेवटी माझ्या वाट्याला फक्त हे शब्द उरले, तरी ते मला खूप पुरतील, ह्याची साक्ष म्हणून त्या कविता.






4/30/10

नादान हैं जो...

परवा कामावरून परत घरी येतांना रेडियो सुरू केला, तर अचानक तलतचा आवाज- मला एकदम माहेरचं माणूस भेटावं तसं झालं. लहान असतांना आमच्या घरी पं. जीतेंद्र अभिषेकी, पं वसंतराव देशपांडे, हे देव होते. फक्त शांतपणे देवघरात बसून नैवेद्य खाणारे देव नव्हे, तर सुरांची शिडी करून, त्यांच्या बरोबर आपल्यालाही स्वर्गात बरोबर घेऊन जाणारे देव...
तलत आणि लता मात्र घरचेच होते. दुपारी चहा पितांना किंवा रात्री आईस्क्रीम खातांना गप्पा रंगवणारे family friends! आमच्या बाबांची सवय होती, एक गाणं आवडलं, की ते टेप घासेतोवर वाजवायचं, आणि वाजवतांना स्वत:ही आळवायचं... तेव्हा पाठ झालेला तलत......तो काल परत......अचानक!

हैं सबसे मधुर वो गीत जिन्हे
हम दर्द के सुर मे गाते हैं...........हम दर्द के सुर मे गाते हैं ।

माझा अतर्क्यावर विश्वास आहे. हे गाणं होतं, की माझी मनस्थिती समजून घेणारी अज्ञात शक्ती? कॉलेजात असतांना Percy Bysshe Shelley ची "To a Skylark" शिकतांना, त्यावर आधारित हे गाणं ऐकून एकदम ती कविता पण उमजल्यासारखी झाली होती.

Skylarkच्या स्वर्गीय आवाजाची अमूर्तता शेली ला दु:खांच्या पलिकडच्या जगातून आल्याचा भास होत होता. "तू कवी आहेस, आपल्याच भावविश्वाच्या किरणांत लपलेला, जगाला आशा-निराशेच्या द्वंद्वाची जाणीव करून देणारा?" "की तू बागेतला काजवा आहेस, फुलापानांआड दडून स्वैर गुणगुणणारा?"


लाख उपमा देऊनही न सुटलेलं कोडं असं, की तुझ्या गाण्यामागची स्फूर्ती कुठली आहे? दु:खाचा लवलेशही नसलेला शुद्ध परिपूर्ण स्वर- पृथ्वीवरच्या अर्ध्या-अधूऱ्या जगण्यातून तो स्वर आम्ही आणावा कुठून?

We look before and after,
And pine for what is not:
Our sincerest laughter with some pain is fraught;
Our sweetest songs are those that tell of saddest thought.

काँटों मे खिले हैं फूल हमारे
रंगभरे अरमानोंके......रंगभरे अरमानोंके ।
नादान हैं जो, इन कांटोसे
दामन को बचाए जातें हैं ॥

दु:खातून मुक्ती नव्हे, तर दु:खापासून पळवाट काढणाऱ्या skylark च्या स्वर्गीय, अमर्त्य गाण्यापेक्षा, दु:ख पचवून पुढे जाणा़या माणसाचा चा शेलीने पुरस्कार केला. दु:ख सोसल्याशिवाय सुखाची व्याख्या करता येत नसते, हे शेलीच्या कवितेचं सार आहे.

पण शैलेंद्र सिंग ह्यांचे बोल तिथेच न थांबता, उत्तुंग आशावादाकडे आपल्याला घेऊन जातात.
जब गम का अंधेरा घिर आए,
समझो के सवेरा दूर नही..........दूर नही ।
हर रात का है पैगाम यही
तारे भी यही दोहराते हैं.......... तारे भी यही दोहराते हैं॥

दुसऱ्यांच्या दु:खात समरस होऊ शकण्यात माणसाच्या अश्रूंची खरी पवित्रता दिसते.

पहलू में पराये दर्द बसाके,
हँसना हँसाना सीख ज़रा..... तू हॅंसना हॅंसाना सीख ज़रा
तूफान से कहदो घिर आए,
हम प्यार के दीप जलाते हैं....... हम प्यार के दीप जलाते हैं ॥

जब हदसे गुज़र जाती है खुशी
आँसू भी छलकते आते हैं........ आँसू भी छलकते आते हैं॥